अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

‘कर्जमाफीसाठी ८ महिन्यांची तारीख शेतकऱ्यांच्या फायद्याची!’ – बच्चू कडू यांचे सडेतोड स्पष्टीकरण

शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अलीकडेच झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीसाठी दिलेल्या ३० जून २०२६ या तारखेवर सविस्तर भाष्य केले आहे. अनेकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, ही तारीख शेतकऱ्यांसाठी तोट्याची नसून, यामुळेच या वर्षातील सर्वाधिक अडचणीत असलेला शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत येईल. आंदोलनादरम्यानची नेमकी परिस्थिती, सरकारची भूमिका आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेण्यात आले, यावर त्यांनी परखड मत व्यक्त केले.

ADS किंमत पहा ×

आंदोलन थांबवण्यामागील निर्णायक क्षण

आंदोलनाला सुरुवात झाल्यावर पहिल्या दोन दिवसांत बच्चू कडू यांनी बैठकीला जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, २९ तारखेला परिस्थिती बदलली आणि आंदोलनावर एकामागून एक संकटे कोसळली. पहिले संकट म्हणजे कोर्टाचा रास्ता मोकळा करण्याचे आदेश, ज्यामुळे आंदोलकांची गर्दी कमी झाली. त्यानंतर २९ तारखेला रात्री मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक आंदोलकांना मंगल कार्यालयात आसरा घ्यावा लागला आणि काही लोक थेट घरी निघून गेले. या नैसर्गिक संकटासोबतच, अपंग शेतकऱ्यांना परत जायचे होते, तर पोलिसांनी इतर जिल्ह्यातून येणारे कार्यकर्ते आणि वाहतूक अडवून ठेवली होती. या चारही संकटांमुळे आंदोलन थांबल्यामुळे, आत्तापर्यंत झालेल्या आंदोलनाचा फायदा घेऊन काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी मुंबईला जाऊन चर्चा करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता, म्हणूनच मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला, असे कडू यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment