अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

नांदेडमध्ये रब्बी हंगामात केवळ ८% पीककर्ज वाटप; बँकांचा हात आखडता, शेतकरी हवालदिल

६८३ कोटींच्या उद्दिष्टापैकी फक्त २४ कोटींचे वाटप; कर्जमाफीच्या घोषणेमुळे बँका आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम.

कर्जवाटपाची गती अत्यंत मंद

नांदेड जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ६८३.२१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, रब्बी हंगाम सुरू होऊनही पीककर्ज वाटपाचा वेग अत्यंत मंद असल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, आजपर्यंत जिल्ह्यात केवळ ८.७१ टक्क्यांनुसार २४.५६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. शेतकऱ्यांच्या गरजेच्या तुलनेत झालेले हे अत्यल्प वाटप जिल्ह्यातील शेती व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

ADS किंमत पहा ×

राष्ट्रीय बँका आणि ग्रामीण बँकांकडून निराशा

जिल्ह्यातील खासगी, व्यापारी, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसोबत समन्वय साधून अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कर्ज वाटपाचा कार्यक्रम राबवत असले तरी, प्रामुख्याने राष्ट्रीय बँका तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीककर्ज वाटप अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे. या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय बँकांकडून ७२१ शेतकऱ्यांना १९.०८ कोटी रुपये, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून ५७२ शेतकऱ्यांना ५.७२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

Leave a Comment