अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

ढेंच्या लागवड: जमिनीसाठी वरदान; हिरवळीच्या खतामुळे रासायनिक खतांचा खर्च वाचणार

केवळ ४५ दिवसांत एकरी ८० क्विंटल खत निर्मिती; जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता कल

सध्याच्या काळात रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती आणि जमिनीचा खालावत चाललेला पोत पाहता, शेतकऱ्यांसाठी हिरवळीचे खत (Green Manure) हा एक अत्यंत फायदेशीर पर्याय ठरत आहे. यामध्ये ढेंच्या (Dhaincha) पिकाची लागवड जमिनीची नैसर्गिक सुपीकता वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते. कृषी तज्ज्ञांच्या मते, ढेंच्या हे पीक केवळ जमिनीला सेंद्रिय खतच देत नाही, तर जमिनीतील क्षारतेचे प्रमाण कमी करून ती लागवडीयोग्य बनवण्यास मोठी मदत करते. विशेष म्हणजे हे पीक हलक्या, मध्यम, भारी आणि अगदी क्षारयुक्त जमिनीतही जोमाने येते, त्यामुळे सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त ठरत आहे.

ADS किंमत पहा ×

लागवडीची सोपी पद्धत आणि कमी खर्च

ढेंच्याची लागवड करणे अत्यंत सोपे आणि कमी खर्चाचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेत तयार करून दीड ते दोन फूट अंतरावर सऱ्या पाडून बियाणे पेरावे. यासाठी प्रति एकर केवळ २० ते २५ किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे आणि त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा पाणी दिल्यास पीक जोमाने वाढते. हे पीक पूर्ण वाढल्यानंतर म्हणजेच साधारणपणे ४५ ते ५० दिवसांत फुलोऱ्यावर असताना वखराच्या किंवा कुळवाच्या साहाय्याने जमिनीत गाडले जाते. यामुळे हे हिरवे पीक जमिनीत कुजते आणि पुढील पिकासाठी उत्कृष्ट खत तयार होते.

Leave a Comment